मनातली ग़ज़ल !

दिल ही तो है एक सिने में
जो  धड़कता  है तेरे लिए
ग़म कि गलियों मे हमने
जाना कभी का  छोड़ दिया !
इस इश्क के मेह्फुस तराने मे
हमने खुद को आईना दिखाना छोड़ दिया !
तेरा क्या है तू आकर चला जायेगा
पर हमने ज़माने से नाता तोड़ दिया !

वाचण्यात आलेलं एक लेख

सरळ रेषेतील प्रवास!

शुभदा पटवर्धन
‘जंक्शन’ या आत्मचरित्राला एक वेगळं परिमाण लाभलेलं आहे, ते वेगळ्या व्यावसायिक चौकटीमुळं. विनायक रत्नपारखी यांनी नोकरीच्या कालावधीत तिकीट कलेक्टर, फायरमन, शंटर, गुडस ड्रायव्हर, घाट ड्रायव्हर, मेल एक्स्प्रेस ड्रायव्हर, मोटरमन अशा विविध भूमिका बजावल्या आहेत.

पळती झाडे बघत मामाच्या गावाला घेऊन जाणा-या आगगाडीशी आपलं अगदी लहानपणापासून सख्य जुळलेलं असतं. त्यामुळे वाऱ्याशी स्पर्धा करत ही लांबलचक गाडी जोरात पळवत नेणारे ड्रायव्हरदादा म्हणजे हीरो वाटतात. ‘जंक्शन’ हे अशाच एका ड्रायव्हरदादांचं आत्मचरित्र. आजकाल आत्मचरित्र लिहावंसं वाटणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. बहुतांशी त्यात अतिउत्साही हौशी मामलाच आढळून येतो. पण ‘जंक्शन’ या आत्मचरित्राला एक वेगळं परिमाण लाभलेलं आहे, ते वेगळ्या व्यावसायिक चौकटीमुळं. विनायक रत्नपारखी यांनी नोकरीच्या कालावधीत तिकीट कलेक्टर, फायरमन, शण्टर, गुड्स ड्रायव्हर, घाट ड्रायव्हर, मेल एक्सप्रेस ड्रायव्हर, मोटरमन अशा विविध भूमिका बजावल्या आहेत. पण या पुस्तकात प्रामुख्यानं प्रतििबबित होते, ती त्यांची ड्रायव्हर ही भूमिका. या क्षेत्राविषयी ओळखीच्या मोटरमनशी झालेल्या गप्पांमधून या आधीही बरंच काही ऐकलेलं होतं. त्यामुळं या क्षेत्रातील ताणतणाव, धोक्यांची कल्पना होती. पण या पुस्तकात त्याच्याही पलीकडचं बरंच काही वाचायला मिळतं. नोकरीतल्या अनुभवांमुळे लाभलेलं आगळेपण सोडलं, तर तसं हे आत्मचरित्र एका सरळ रेषेत जाणारं. त्यात फारसे चढउतार नाहीत. पण त्यात डोकावणारं वेगळं जग मात्र शेवटपर्यंत खुणावत राहातं. गुंतवून ठेवतं. यात सावनी केळकर यांच्या प्रवाही शब्दांकनाचाही वाटा अमान्य करून चालणार नाही.

आयुष्य जसं वाटय़ाला आलं, ते प्रामाणिक प्रांजळपणे मांडण्याचा हा प्रयत्न. वडील रेल्वेतच नोकरीला असल्यामुळे तिघंही मुलं रेल्वेतच नोकरीला लागली. या नोकरीला किंमत नव्हती, रेल्वेत काम करणं हे किती हलक्या दर्जाचं मानलं जात होतं, हे सांगण्यासाठी ते मुलगी बघण्याचा किस्सा सविस्तरपणे सांगतात. लेखक रेल्वेत कामाला म्हणून त्यांच्यासाठी काळी-कुरूप मुलगी, तर तिच्या गोऱ्या बहिणीसाठी बँकेतल्या क्लार्कचं स्थळ निश्चित केलं गेलं होतं. या प्रकरणामुळं अपमानाची भावना त्यांच्या मनात घर करून बसली. या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे, हे पाहून धक्का बसला, तरीही त्यांनी हे क्षेत्र मात्र सोडलं नाही. त्यांची सुरुवात तिकीट कलेक्टर म्हणून झाली असली तरी तिकीट कलेक्टरची भूमिका त्यांना कधीच आवडली नव्हती. त्यामुळेच केवळ या कामातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी मार्ग बदलला आणि इंजिन ड्रायव्हर म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. या वाटचालीचा प्रवास एक वेगळंच जग आपल्या नजरेसमोर उभं करतो. यात बऱ्याच तांत्रिक बाबींची माहिती मिळते. सांधे बदलताना होणारा खडखडाट इथपर्यंतच मर्यादित असणाऱ्या माहितीत बरीच भर पडते. त्यामुळं मनातील काही प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि कुतूहलही बऱ्यापकी शमतं. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रकाशझोत टाकतानाही त्यांनी हात आखडता घेतलेला नाही. नोकरीच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांना अनेक प्रकारचे अनुभव आले. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कित्येक अपघातांचं साक्षीदार व्हावं लागलं. या अपघातांनी मृत्यूचं दारुण दर्शन घडवलं. कधी त्यांच्या जिवावर बेतलेल्या प्रसंगातून ते सहीसलामत बाहेर पडले. रात्री-बेरात्री कराव्या लागणाऱ्या प्रवासात कथित भुता-खेतांचंही दर्शन झालं. गाडीखाली येऊन मरणाऱ्या जिवांबाबत मोटरमन अगतिक असतात. याच अगतिकतेपायी त्यांच्या गाडीखाली ६९ लोकं आली, याची बोच त्यांना अस्वस्थ करते तशी आपल्यालाही. अर्थात इतकी माणसं त्यांच्या गाडीखाली आली, कारण ते काहीच करू शकत नव्हते. गाडीखाली येऊन जखमी झाल्याच्या, मृत झाल्याच्या बातम्या आपण कायम वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो. पण या पुस्तकातील घटना वाचताना त्या कोणी तरी प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत, या कल्पनेनं जास्तच परिणामकारक ठरतात. मोटरमन हतबल असतात, ही गोष्ट खरी असली तरी जिथं शक्य होतं, तिथं त्यांनी माणसंच काय, प्राणीही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. टिटवाळ्याच्या काळू पुलाच्या मधोमध एक गाय चारही पाय रुळाच्या स्लिपरमध्ये अडकलेल्या अवस्थेत होती. ती हालचालही करू शकत नव्हती. या गायीला त्यांनी किती शर्थीनं वाचवलं, ते प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तसंच ज्या वेळेस त्यांनी कोणाला वाचवायचा प्रयत्न केला, तेव्हा इतरांनी ‘जंक्शनला नसती झेंगटं गळ्यात अडकवून घेतात?’ अशाच नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं होतं. अशा वेळी सहप्रवासी मदतीसाठी पुढं यायला तयार नसतात, याचं त्यांना वैषम्य वाटल्याखेरीज राहात नाही. आपापल्या ऑफिस-घरी पोहोचण्याची घाई, नंतर मागं लागणारा चौकशीचा ससेमिरा, पोलीस तपास याची भीती अशी अनेक कारणं यासाठी कारणीभूत असली तरी माणुसकीचा विसर पडू नये असं त्यांना मनापासून वाटतं. त्यांना आलेले काही अनुभव तर असे आहेत की ताíकक कसोटीवर घासून पाहिल्यास त्यात विश्वास बसावं असं काहीच नाही. तरीही एक अनुभव म्हणून ते नाकारताही येत नाहीत. त्यामुळे ते फक्त या अनुभवांची नोंद करतात, पण स्पष्टीकरण देण्याजोगं काही नाही, हेही मान्य करतात. एकंदरीतच लाखो लोकांना घेऊन जाताना येणारा ताण अग्निपरीक्षाच बघणारा असतो, हे जाणवत राहातं.

मोटरमनचे संप होतात, त्यावेळेस सगळं जनजीवन कसं विस्कळीत होऊन जातं, याचा अनुभव वेळोवेळी घेतलेला असतो. त्या वेळेस सामान्यांना वेठीस धरणाऱ्या मोटरमनना शिव्याशाप सहन करावे लागतात. पण कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. हे पुस्तक वाचल्यानंतर कदाचित दुसरी बाजूही समजून घेता येईल.

lokprabha@expressindia.com
http://www.loksatta.com/lokprabha/20111014/vachanananda.htm

शुक्रतारा मंद वारा

श्रीनिवास खळे ( खळे काका ) यांचे आज ठाणे येथे निधन झाले. त्यांचा वर आलेला आजच्या लोकसत्तेत अग्र लेख वाचल्यावर मन भरून आले. इथे वाचा

खळे काकां  बद्दल विकिपीडिया  वर वाचा

यार टेक इट इझी सब चालता हे इन मुंबई सिटी !

मामलेदारची मिसळ
कैलाश्ची लस्सी
सगळे म्हणतात मला
यार टेक इट इझी
सब चालता हे इन मुंबई सिटी !

गिर्ल फ्रेंड गेली पळून
नातं गेलं मोडून
सगळे म्हणतात मला
यार टेक इट इझी
सब चालता हे इन मुंबई सिटी !

नौकरी वाटे त्रास
पण पैसा हवा हमखास
डिग्री नाही, नाही डिप्लोमा
सगळे म्हणतात मला
यार टेक इट इझी
सब चालता हे इन मुंबई सिटी !

शिक्षण झाले महाग
सोने सगळे गाहाण
दुधात पाणी जास्त
सगळे म्हणतात मला
यार टेक इट इझी
सब चालता हे इन मुंबई सिटी !

घराचे भाव १० पट
भाडे त्याहून तिप्पट
सरकारचे आश्वासन, भिकेला नक्की लावू देशाला
सगळे म्हणतात मला
यार टेक इट इझी
सब चालता हे इन मुंबई सिटी !

***उगाच सुचलेल्या ओळी

न्क्क्द वाले डिस्को उधार वाले खिस्को

हल्लीच घर खरेदी साठी आम्ही काही मित्र मंडळी जमा झालो होतो. आमच्या सर्वांचा साधारण ब्ड्जेत वीस ते पंचवीस लाख असे होते. आली कडे घर महाग झालेच आहे हे माहित होत परंतु घर घेणं हे गरजेचं हि होतं.प्रत्येक बिल्डर चा प्रोजेक्ट पाहिला जवळ जवळ १५ प्रोजेक्ट्स पाहिले. तिथे गेल्यावर कळालं कि “न्क्क्द वाले डिस्को उधार वाले खिस्को “. अहो आम्ही विचार करत होतो २५ लाखात २ बेडरूम किचन तरी होईल , पण इकडे १ बेडरूम किचन ३५ लाखला विकतोय. आणि त्यात १० लाख ब्ल्याक ( म्हणजे त्या पैश्याचे काही एक कागद पत्र मिळणार नाही ). बाजार भाव प्रमाणे हे ३५००-५००० असलेले जागेचे भाव , बिल्डर ६०००-७००० च्या हिशोबाने  विकत आहेत. कला पैसा सफेद करणारी माणसा मोठ मोठ्या गाडी मधून येतात आणि ४-५ रूम अशेच बुक करून मोकळे. साधा माझ लोन देखील होत्नही. पुढे काय होणार याची कल्पना सुधा करू शकत नाही.
इकोनोमिक मेल्ट डाऊन जेह्वा २००९ मध्ये झाले होते , त्या वेळी या फ्ल्याटस  ची किंमत निम्मे होते. कोणी हि फ्ल्याटस विकत घेत न्हवते. तर आता बाजार वर आहे म्हणून आणि गुंतवणुकीचा चांगला यश मिळावा या साठी जागा विकत घेणारी मंडळी वाढली आहेत. मुंबईत  सध्या जागेच्या कम्तार्ते मुळे अजून जास्त भाव वाडीचे ऐकून आहेत. आणि साधारण माणूस आपल्या बेसिक नीड्स भागवू  शकेल कि नाही असे वाटतंय

चाळिशीत करिअर बदलायचंय?

 

चाळिशीत एकसुरी आयुष्याने साचलेपण आलेले असते. ‘वेगळं काहीतरी करायला हवं,’ ही इच्छा असते. पण तरीही करिअरमध्ये बदल करायला मन कचरत असतं. एकदा का आपल्या मनातली ‘जमेल ना?’ ही शंका संपली, मनात वारंवार येणाऱ्या ‘आता निम्मं आयुष्य संपल्यावर कशाला काही करायचं?’ या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळाले की चाळिशीतही नव्या दमाने नवी वाटचाल सुरू करता येते.

 

‘गेली २२ वर्षे मी नोकरी करतोय. तेच काम, तेच कागद, अगदी बदल्या झाल्या तरी त्याच प्रकारची ऑफिसं आणि माणसं.. आयुष्य फार एकसुरी वाटायला लागलंय.’

 

‘गेल्या २० वर्षांत फक्त संसार केला. खूप कंटाळा आलाय. मुलं मार्गी लागली. आता दोघांचं कामही फारसं नसतं.. कॉलेजात असताना खूप काहीतरी करायचे मी, पण आता नव्यानं काय सुरू करायचं, कळत नाही. सगळं हातातून सुटल्यासारखं वाटतं.’

 

चाळिशीच्या आसपास अनेक स्त्री-पुरुष अशा प्रकारच्या मानसिक आंदोलनात सापडतात. नोकरदारांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावीशी वाटते, पण ऑफिसच्या विशिष्ट वेळा आणि विशिष्ट कामांची अशी सवय झालेली असते की, ‘बदल झेपेल का?’ हा प्रश्न तीव्र असतो. २० र्वष एकाच ऑफिसमध्ये काढलेले स्त्री-पुरुष आणि २० र्वष घरात काढलेली स्त्री दोघांची मानसिकता तेव्हा सारखीच असते. नोकरी करणाऱ्यांचा जगाशी थोडाफार संपर्क शिल्लक असतो आणि त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य अनुभवलेलं असतं तर गृहिणीचा बाहेरच्या जगाशी संबंध अगदी कमी आणि आर्थिक परावलंबनाची सवय झालेली असते, हा महत्त्वाचा फरक. तरीही एकसुरी आयुष्याचा कंटाळा आणि ‘वेगळं काहीतरी करायला हवं’ ही दोघांचीही इच्छा सारखीच असते.

 

व्यावसायिकांच्या बाबतीत हा प्रश्न एवढा गंभीर होत नाही. कारण सहसा तो व्यवसायच नवीन संधी देत आपोआप पुढे नेतो. कामाचं स्वरूप एवढं अनेकविध असतं की, फारशी ‘मोनोटोनी’ वाटत नाही, पण एकसुरी काम करणाऱ्यांना मात्र या सुमारास एक वेगळीच अस्वस्थता येते.

 

चाळिशीच्या जवळपास होणारा आणखी एक बदल म्हणजे आता ‘आपली’ म्हणावी अशी फक्त १० ते १५ वर्षंच हातात आहेत, हे जाणवायला लागतं. राहून गेलेल्या अनेक गोष्टी आता आठवायला लागतात. काहींना आर्थिक किंवा कौटुंबिक गरजांमुळे फारसा बदल शक्य नसतो. काहींना आर्थिक अडचणी फार गंभीर नसतात, तरीही काय करायचं सुचत नसतं किंवा जुनं सोडून नवीन काही करायचा धीर होत नसतो. बरीच र्वष घरात काढल्यानंतर अनेक गृहिणींचा जगात वावरण्याचा आत्मविश्वासच संपत गेलेला असतो. सर्व प्रकारच्या व्यक्तींनी या टप्प्यावर थांबून एकदा शांतपणे आढावा घ्यायला हवा. आजपर्यंत जगलो, तसंच शेवटपर्यंत जगायला आपल्याला आवडेल की, कसं हे तपासायला हाच योग्य टप्पा असतो. आपल्याला ‘आता’ आयुष्याकडून नक्की काय हवंय, ते शोधायची आणि दडपणाशिवाय आवडीच्या करिअरकडे वळण्याची हीच वेळ असते. जीवनशैलीतला बदल थोडा करायचा, टप्प्याटप्प्याने करायचा की, आमूलाग्र हे ज्याचं त्यानं आपापल्या स्वभाव आणि परिस्थितीप्रमाणे ठरवावं, पण इच्छा असेल तर आजपर्यंतच्या जीवनशैलीत बदल करणं शक्य आहे, हे समजणं आणि स्वीकारणं महत्त्वाचं.

 

अनेकांच्या प्रामुख्याने अनेक स्त्रियांच्या बाबतीत असं होतं. शिक्षण संपल्यानंतर नोकरीला लागल्यानंतरची १०-१२ र्वष त्यांनी व्यावसायिकतेनं दणकून काम केलेलं असतं. त्यानंतर कौटुंबिक गरजेपोटी त्यांना आपल्या कामाचा वेग कमी करणं भाग पडतं. दिवसाचे १२-१४ तास पूर्ण काम, भरपूर फिरती ही अनेक व्यवसायांची गरज असते. अशा वेळी मुलांना वेळ देता यावा, म्हणून किंवा स्वतलाही बदल हवासा वाटतो, म्हणून अनेकजणी कामात ब्रेक घ्यायचा विचार करतात. अशा वेळेस मुलासाठीचा वेळ बाजूला काढल्यावर उरलेल्या वेळात करता येण्यासारखं आणि आनंद देणारं काम त्यांना हवंहवंसं वाटतं. अशा वेळेस ब्रेक घेतल्यास खरं तर त्या व्यवसायाच्या पूर्ण वेळच्या बांधीलकीतून मुक्त होतो. अशा वेळी नवी दिशा लगेच सापडली नाही तरी करिअर बदलायचं, हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवायला हवं. कदाचित ‘आता पुढे काय,’ हा प्रश्न काही काळ त्यांची झोप उडवेल.

 

व्यवसायात जबाबदारी घेण्याच्या एका पातळीपर्यंत पोहोचून आल्यानंतर आपल्या स्वत:कडूनच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्यामुळे नव्या करिअरमध्ये स्थिरावताना सुरुवातीला जुन्या कामाशी आपण नकळत तुलना करायला लागतो. अशा वेळेस हे लक्षात घ्यायला हवं की, अगदी विशीतल्यासारखे आपण नवशिके नसलो तरी जे करायचंय, त्यातल्या कौशल्यापर्यंत पोहोचेपर्यंत कष्ट करायलाच लागतील. धीर धरायला हवा. आता कामासाठी आपण पूर्वीसारखा भरपूर वेळ देऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवायला हवं. सुरुवातीला फक्त प्रवाहासोबत राहायला हवं. हे स्वीकारल्यावर मात्र खूप दारं आपल्यासाठी खुली होऊ शकतात. जोहारी विंडोप्रमाणे तुमच्यातलं जे चांगलं इतरांना समजेल तसं काम आपोआप चालत येतं. उदा. लेखनाशी संबंधित व्यक्तींना पुस्तकाचं लेखन, संपादन आणि लेखनाशी संबंधित आवडीच्या अनेक गोष्टी या काळात करता येतील. जाहिरातींसाठी आणि फिल्म्ससाठी कॉपीरायटिंग, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमासंबंधित कामे करता येतील. संस्थांसाठी व्याख्याता, रिसोर्स पर्सन म्हणून जाता येईल. या सगळ्या कामातल्या विविधतेमुळे एवढी र्वष तेच ते करून कंटाळलेला मेंदू मात्र नक्की तरतरीत होईल, हे नक्की. एकीकडे ‘हे नको, ते पुरे’ असं होत असतानाच ‘काय हवं?’च्या जवळ निश्चितपणे जाता येईल.

 

चाळिशीत नव्याने काही सुरू करताना आपलं आपण काय करायचं, काय वाचायचं, कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं ते कळत नाही. तरीही दिशा सापडण्यासाठी कुठून तरी फॉर्मल सुरुवात करायला हवी, हे नक्की केलं पाहिजे.

 

..तरच पुन्हा एकदा शिकायला सुरूवात करता येईल. मोठेपणी मन थिअरीसोबत आपोआपच प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशनचा विचार करतं. त्यामुळे मोठेपणीचं शिकणं जास्त आनंददायी आणि उपयोगी असतं, असं माझं स्वानुभवावर बेतलेलं मत आहे. मार्काची चिंता नसल्यामुळे मोठेपणी जास्तीत जास्त भर समजून घेण्यावर राहतो आणि आकलन -अभ्यास – स्मरण याबद्दलच्या गोष्टी थिअरीसोबत प्रॅक्टिकलीही कळतात. विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थीवृत्तीच्या अधिक जवळ जाता येते. त्याच वेळी हेही जाणवतं की, मोठी माणसं आणि लहान मुलं यांच्याबाबतच्या तपशिलात फरक असेल, पण तत्त्वं सर्वाना सारखीच. हे शिकणं खरंच फार मस्त असतं. कुणाशीच स्पर्धा नसते, पण ‘मला हे यायला पाहिजे’ ही आच लहानपणीपेक्षा जास्त वाटते. खोलात जाणं सहज होत होतं. आकलनक्षमता तर वाढलेली असतेच.

 

मात्र मोठेपणी शिकण्यातला आणि समजण्यातला आनंद खूप असला तरी पेपर लिहायच्या दृष्टीनं शब्द, उत्तरं, मुद्दे पटापट आठवत नाहीत. त्याचं कारण वाढतं वय आणि अनेक व्यवधानं आहेत, हे सर्वमान्य गृहितक थोडय़ाफार प्रमाणात खरंही असतं, पण एक नक्की की, लहानपणी शाळा-कॉलेजात असताना आपण नीट लक्ष दिलं नाही तरी लेक्चर्सना ते सगळं एक-दोनदा कानावरून गेलेलं असतं, टय़ुटोरिअल्स लिहिलेली असतात, त्यामुळे हाताखालून गेलेलं असतं. त्यामुळे आपण परीक्षेच्या अभ्यासाला बसतो तेव्हा विषय चांगलाच ओळखीचा असतो. इथे एकटय़ानं अभ्यास करताना मात्र फक्त स्वत:चं वाचन एवढाच मार्ग असतो. त्यामुळे ते दोन-तीन वेळा वाचल्यानंतर हळूहळू ते ओळखीचं वाटायला लागतं, पण तेवढा धीर न धरता आपण आधीच हवालदिल होतो की, ‘आता पूर्वीसारखं पटपट समजत नाहीये, जमत नाहीये.’ हे लक्षात आल्यावर विषयाचा फील येईपर्यंत किमान तीन-चार वेळा वाचायला लागणार आहे, हे गृहित धरायला हवं. मग अस्वस्थता आणि विफलता कमी होते. विषयाची परिभाषा (टर्मिनॉलॉजी) सवयीची होणं, हा पहिला अडथळा एकदा ओलांडला की, पुढे सोपं असतं आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शिकणं शक्यही असतं.

 

आपल्याकडे अनेक संस्था संबंधित विषयांवरच्या कार्यशाळा घेत असतात. बागकाम, ईमूपालन, मशरूम कल्टिव्हेशन, अशा विषयांवरच्या कार्यशाळा अनेक ठिकाणी उपलब्ध असतात, पण बहुधा त्यातून ताबडतोब पैसा मिळवणे, हेच अपेक्षित असतं. हौसेसाठी इंडॉलॉजी किंवा इकॉलॉजीच्या कार्यशाळाही असतात. हे सगळं एकत्रितपणे पाहिलं तर हौस, आनंद आणि आपण मिळविलेल्या ज्ञानाचा ‘बायप्रॉडक्ट’ म्हणून अर्थार्जन असं झालं तर चाळिशीनंतरचा एकसुरीपणा संपून जास्त मजा येईल, असं वाटतं. पैसा प्रत्येकालाच हवा असतो, पण फक्त पैसा एवढंच ध्येय ठेवून आपण एकाच प्रकारचं काम करीत राहतो, तेव्हा कालांतरानं कंटाळा येतोच. कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून पार पडल्यावर आता ज्यांना आयुष्याला आपल्या आवडीचा अर्थ द्यायचाय आणि ज्यांना ते शक्य आहे, त्यांनी वेगळ्या करिअरचा मार्ग चोखाळून पाहायलाच हवा. ‘कोण काय म्हणेल?’पेक्षा ‘आपला अर्थ आपल्यापाशी’ हे जास्त खरं असतं.

 

अनेकदा वाटते- ठरलेल्या मार्गाने अर्थप्राप्ती करणे अनिवार्य नसेल तर ५८व्या वर्षांपर्यंत निवृत्तीची वाट कशाला पाहायची, नंतर उत्साहाचा फारच कमी काळ उरतो. त्यापेक्षा आधीच स्वेच्छानिवृत्ती घेऊन ती पाच-दहा र्वष नव्या करिअरमध्ये स्थिरावण्यात घालवली तर ताजेपणा जास्त टिकेल.

 

विशेषत: महिलावर्गाबद्दल मला हे तीव्रतेनं वाटतं. चाळिशीनंतर जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात, हातात कला असते, ऊर्जा असते, भरपूर पैसा मिळवलाच पाहिजे, असा आग्रह नसतो. पूर्वी मिळविलेली पदवी, शिक्षण मात्र आता कालबाह्य ठरू शकतं. मग वाढू काय शकतं तर आपल्याला जे आवडतंय आणि येतंय त्यातलं कौशल्य. अगदी आपल्या आवडीचं बागकाम, फॅशन डिझायनिंग, संगणक थोडं थोडं येत असतं, पण अशा गोष्टींसाठीसुद्धा एखादा संबंधित कोर्स करून त्याबद्दलची दृष्टी विस्तारली तर त्या कामातलं कौशल्य वाढेल. कौशल्य आनंद तर देतंच, पण आत्मविश्वासही देतं. कौशल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण सतर्क आणि मोकळे असलो तर कुठलीही वाट पुढे नेतच असते. नवनवीन अनपेक्षित किंवा माहितीही नसलेल्या कामांच्या संधी पुढे येत असतात, पण तिथपर्यंत पोहोचणंच कठीण होतं, कारण संपत नाही ती आपल्या मनातली ‘जमेल ना?’ ही शंका किंवा ‘आता कुठे निम्मं आयुष्य संपल्यावर काही करायचं?’ ही जोपासलेली खंत. या दोन गोष्टी नवीन काही सुरूच करू देत नाहीत आणि आयुष्याला आणखी आणखी साचलेपण येतं.

 

मधल्या वयातल्या व्यावसायिक, नोकरदार आणि गृहिणींसाठी अनेक उपयुक्त विषयांची माहिती करून देतील, अशा छोटय़ा कार्यशाळा घेणाऱ्या संस्थांचीच आता गरज निर्माण झालीय. ज्यात व्यावसायिकता असेल आणि कुणालाही तिथे स्वत:च्या वयाचा निर्थक कॉम्प्लेक्स येणार नाही. आपल्याकडे अजून फक्त आवड आहे म्हणून शिकायचं, ही संकल्पना इतकी रूढ नाही, पण आपल्याकडचा एकूणच सामाजिक साचलेपणा दूर करायचा असेल आणि कार्यसंस्कृतीच्या दिशेनं समाज म्हणून जायचं असेल तर सुरुवात स्वत:पासून करायला हवी. स्वत:तलं कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्यापासून करायला हवी. नवनवं शिकत राहायला हवं.

 

Eat the Frog First अशी एक म्हण आहे. म्हणजे जी भीती फार जास्त डराव डराव करतेय, तिला आधी संपवा. खरा ‘फ्रॉग’ आहे स्वत:ची स्थितिशीलता (इनर्शिया). ‘नाही जमलं तर काय होईल?’ची भीती. ‘पुढच्या रस्त्यावरचा प्रत्येक दगड, प्रत्येक खड्डा मला माहीत असेल तरच मी पुढे जाणार’ अशी अपेक्षा. अगदी आमूलाग्र बदल करणं अवघड असेलही. करिअरबद्दल अनावश्यक धोका पत्करावा असंही नाही, पण बदल मनापासून हवा असेल तर काही दिवस, काही महिने एकदा तरी स्वत:च्या इच्छेला देऊन पाहायला हवेत. पुढच्या वळणावर एखादं सुंदर नंदनवनसुद्धा असू शकेल. जाऊन पाहिलं तरच कळेल आणि इच्छा असेल तर मार्ग सापडेलच.

***http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=172356:2011-07-24-15-33-01&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116

गटारी स्पेशल कविता !

दरपार्टीच्याशेवटी एक क्वार्टरकमी पडते
दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते…

पिण्याचाकार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते…

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम’पारो की दारु’
याचा मला अजून संशय आहे

प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते…
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते!

चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD.केल्यासारखे बोलतात

प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते!

फेकणे,मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते
पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते!

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येतो,ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते…
परंतु दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

***इमेल द्वारे पाठवलेली कविता.कवी - अनामिक

कविता !

हरवून  मी  गेलो , थेंब ओले टप टप पडती
दिल खुलास मी रडलो, अश्रू  ओंजळीत विरती
सहजच वाटले ऐसे , ओझे मनातले सरले
स्वतःशीच लढ्त होतो , स्वतः साठीचे जगणे !

गैर नाही कुणाला माझे हे असे वागणे
वेड्यात मोजती मजला हे मला ठाव
शहाणप्णीचे  शिकवणी देतात लाखो इकडे
प्रेमाचे दोन घास नाही कुठेच का हो ?

मी माझ्या रस्त्यावर मोकळा
नाही कुणाचे शाप
नाही डोक्यावर छत्री
नाही डोक्याला ताप !

***सुचलेल्या काही ओळी , मनावर घेऊ नका !

असेही काही घडले?

मंदिराच्या समोर लिहिले असून सुधा , कोणी वाचण्याची तसदी घेत नाही हे दिसून येत असल्याचे छायाचित्र

चक्रम ब्लॉगर

चक्रम ब्लॉगर

एका ऑटो रिक्षा  मध्ये कोंबलेली शाळेतली मुलं

चक्रम ब्लॉगर

चक्रम ब्लॉगर

अपोलो फार्मसी

अपोलो फार्मसीच्या संपूर्ण भारतात असलेल्या दुकानांची यादी इथे दिलेली आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. >> Apollo Pharmacy Pan India Outlets

Follow

Get every new post delivered to your Inbox.